अहिल्याबाई होळकर
अहिल्याबाई होळकर ही मराठ्यांच्या आणि त्यामुळे भारताच्या इतिहासातील एक प्रमुख स्त्री. झाँसीची राणी लक्ष्मीबाई हिच्या बरीच अगोदर आणि बऱ्याच वेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या त्या व्यक्तीबद्दल ब्रिटिश समाजातही आदर होतायाची कल्पना सर्वसामान्यपणे वाचकाला नसते. परंतु आश्चर्य म्हणजे एका ब्रिटिश लेखिकेने अहिल्याबार्इंच्या गौरवार्थ एकोणिसाव्या शतकात दीर्घकविता लिहिली आहेAhalya Baee - A Poem हे पुस्तक माझ्या हाती लागले आणि मी चकित झालो. माझी उत्सुकता शीर्षकापासूनच चाळवली गेली. पुस्तक मूळ स्वरूपात 1849 साली खासगी वितरणासाठी प्रसिद्ध झाले. ते हिंदुस्तानात 1904 साली प्रकाशित झाले. लेखिका या कवयत्री आणि नाटककार होत्या. त्यांनी अहिल्याबार्इंच्या जीवनातील विविध घटना कवितेच्या रूपात मांडल्या आणि ते करताना सर माल्कम यांच्या A Memoir of Central India या1823 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील घटनांचा आधार घेतला. अनेक ब्रिटिश इतिहासकारांनी तत्कालीन हिंदुस्थानचा इतिहास लिहिला आहे. त्यांच्यापैकी एक सर जॉन माल्कम.

लेखिका प्रस्तावनेत म्हणतेकी त्यांनी कोणत्याही काल्पनिक प्रसंगाची भर घातलेली नाही. इतिहासातील घटना ज्या लेखनात थोडक्यात येतात त्या पाठीमागे भावना काय असतील ते मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.

दीर्घकवितेची सुरुवात येशूची थोरवी गाऊन होते. त्यात पहिली चार पाच पाने गेली आहेत. त्यानंतर अहिल्याबार्इंविषयीच्या कवनाला आरंभ होतो. पहिला प्रसंग अहिल्याबाई त्यांच्या  पुत्राच्या बिछान्यापाशी बसून शोक आणि त्याबरोबर प्रार्थना करत आहे अशा स्वरूपाचा आहे. माल्कम यांनी म्हटले आहेकी अहिल्याबार्इंचा मुलगा मालेराव याने एका माणसाचा खून मत्सरापोटी करवला. तो मुलगा ज्याचा खून झाला त्याचे निरपराधीत्व सिद्ध झाल्यावर त्याने केलेल्या अन्यायाच्या प्रखर जाणिवेने हादरला. त्यातच तो आजारी पडला. अहिल्याबाई मृत व्यक्ती त्यांच्या मुलाचा सूड घेत आहे असे वाटून मृतात्म्याची करुणा भाकत आहे असा प्रसंग कवयत्रीने कल्पला आहे. ती लिहिते -

ती होती एक कृती मत्सरापोटी झालेली. खरे नव्हता समजू शकलाफसगत त्याची झाली

केला आहे यत्न त्याने चूक सुधारण्याचातुझी पत्नी आणि मुले यांची तजवीज करण्याचा

एक संस्मरणीय स्मारक होईल तुझ्या नावानेस्वच्छ होईल तुझे नाव दप्तरातील नोंदीने.

तिने शोक केलामृतात्म्याची करुणा भाकलीपण व्यर्थ! - अशा तऱ्हेने दिवस रात्र अश्रू ढाळत राहिली,

बिछान्याशी त्याच्या बसून करूणा भाकत राहिली ; तिच्या नजर लावण्याची मात्रा नाही चालली

राजवाड्यात सर्वत्र घनदाट शांती भरली. भीषण अशा विकाराने त्याचे काम केले. राजपुत्राचे पार्थिव तेवढे उरले!

अहिल्याबाईने मुलगा निधन पावल्यानंतर राज्य स्वतः सांभाळण्याचे ठरवले. कवयत्री त्या निर्णयाचे वर्णन असे करते -

पण ब्रह्मदेवाने तिच्यावर एक होती सोपविलीएका खूप वेगळ्या कुटुंबाची जबाबदारी .

विविध जातीमिसळलेली घराणीकाही मंद काही भडकूउद्धट आणि भयकारी;

आता तिने कसली पाहिजे तिची कंबर नाजूक भावनांचाही केला पाहिजे आदर  

अहिल्याबाईने न्यायनिवाडा करण्यास सुरुवात केली तेव्हा प्रजेला काय वाटलेत्याचे वर्णन कवयत्री असे करते -

होते प्रजाजन कोणत्याही तऱ्हेचेसगळ्यांनी आनंदाने एकच दृश्य पाहिले;

त्यांची खानदानी बाई न्यायदानावर बसलीन्याय देताना तिने न्यायदृष्टीच ठेवली.

अहिल्याबार्इंनी गरिबांच्या कल्याणाची काळजी सतत केली. त्यांना गरिबांच्यावर झालेल्या अन्यायाची फार चीड येत असे. कवयत्री लिहितात -

जर तिच्या कानावरआली अन्यायाची खबरक्षणात मनात पेटे अंगारभुवई जाई वर;

तिचा आवाज विधवांना वाटे एरवी मधुर. तो होई जरबेचा आणि कानात करी गजर.

तिच्या शेतीविषयक सुधारणांनी काय बदल झालायाबाबत कवयत्रीने लिहिले आहे -

रयत कसु लागली वाडवडिलांची जमीन कष्ट करताना नाही उरली श्रमांची जाणीव.

अहिल्याबार्इंना त्यांच्या पतीच्या निधनानंतर सती जाण्यापासून त्यांच्या सासऱ्यांनी परावृत्त केलेपरंतु आश्चर्य म्हणजे त्यांची मुलगी तिच्या पतीच्या निधनानंतर सती गेली. त्या सतीच्या मिरवणुकीचे विस्तृत वर्णन कवितेत आहे. काही ओळी अशा -

जड पावलांनी उठवला जमिनीवर दबका आवाज मित्रांनी वेढलेला आला पार्थिवाचा साज

जेंव्हा गंभीर ब्राह्मणांबरोबरदिसली त्यांना त्यांची राणीनजर तिच्याचवर खिळली,

तिच्याबद्दल कणव दाटून आली. 

मला वाटतेवाचकांची मूळ पुस्तक वाचण्याची उत्सुकता आता जागृत होईल. ते उपलब्ध आहे - https://www.rarebooksocietyofindia.org/postDetail.php?id=196174216674_10151523420631675  या साइटवर.

अहिल्याबाई होळकर यांच्या साहित्याच्या अभ्यासक विनया खडपेकर म्हणाल्या, की जोनाबेली या ब्रिटीश कवयत्रीने अहिल्याबाईंवर कविता रचल्या आहेत. 

- रामचंद्र वझे 9820946547

vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी 'बँक ऑफ इंडिया'मध्‍ये चाळीस वर्ष काम केले. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची 'शेष काही राहिले', 'क्‍लोज्ड सर्किट', 'शब्‍दसुरांच्‍या पलिकडलेआणि 'टिळक ते गांधी मार्गे खाडीलकरही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंसस्‍त्रीअनुष्‍टुभरुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे 'महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि 'लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

--------------------------------------------------------------------------